शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा; साहित्यिकांना आवाहन

शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा; साहित्यिकांना आवाहन
शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा; साहित्यिकांना आवाहन

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने यवतमाळ जिल्हा कलंकित झाला आहे. या शेतकऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी व्हावे, अशी साद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा अरुणा ढेरे यांना घालण्यात आली आहे.  शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी या संदर्भाने खुले पत्र लिहिले असून त्याद्वारे ही साद घालण्यात आली आहे. पत्रानुसार, आपल्या साहित्यातील योगदानाचा अख्ख्या भारताला अभिमान आहे. आपल्या मनामध्ये प्रचंड कणव, प्रेम आणि आस्था आहे. एका महिलेच्या आयुष्याचा मुख्य आधारच गेला असताना तिच्या मनाची घालमेल एक महिला म्हणून आपण चांगल्या तऱ्हेने समजू शकता.  आपल्या चार-पाच दिवसांच्या मुक्‍कामात एक दिवस इथल्या अन्नदात्यासाठी काढा. त्यांच्या दुःखाशी समरस व्हा, त्यांना जगण्याचं बळ द्या. शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत संवेदनशील मनाच्या साहित्यिकांनी शेतकरी आत्महत्या व दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर आपला प्रवासखर्च व मानधन सोडण्यची तयारी दर्शविली आहे. तो खर्च आयोजकांकडे सुपूर्द केला आहे. मात्र याबाबतीत आमचा आयोजकांवर विश्‍वास नाही. आयोजक हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याविषयी आमच्या मनात मोठी शंका आहे. त्यामुळे आयोजकांकडे हा निधी न जाऊ देता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबापर्यंत पोचवा, असे आवाहन अध्यक्षीय भाषणातून करा, असे पवार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com