संत्रा पीकविम्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कार्यालयांवर

farmers march
farmers march

अकोला ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना संत्रा मृग बहारचा विमा परतावा रक्कम न मिळाल्याने हे शेतकरी मंगळवारी (ता.१७) जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांवर धडकले. शेकडोंच्या संख्येत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले की, अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा या पिकासाठी फळपीक विमा कंपनीकडे उतरविला होता. या विमा कंपनीने अकोट तालुक्यातील उमरा व पणज या महसूल मंडळात हेक्टरी ३८ हजार ५०० रुपयांप्रमाणे १२ मार्चला शेतकऱ्यांना परतावा दिला; परंतु अकोलखेड मंडळाला जाणीवपूर्वक वगळण्यात आले. एकाच तालुक्यात दोन मंडळांत मदत व लगतच्याच एका मंडळाला वगळण्याचा निर्णय अफलातून आहे.  वास्तविक, गेल्या वर्षी कोरडा व या वर्षी ओला दुष्काळ या फळबागांनी झेलला. यामुळे उत्पादनात मोठी घट आली. अशी परिस्थिती असताना विमा कंपनीने संत्रा पिकाला मृग बहारासाठी विमा लाभापासून वंचित ठेवले आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सन २०१९-२० मध्ये झालेल्या अतिपावसाने परिसरातील संत्रा आणि केळी या फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्यासाठी शासनाने तेव्हा मदत जाहीर केली; परंतु अद्याप एकही रुपया मिळालेला नाही, त्याचेही वितरण केले जावे, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com