शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी करणे गरजेचे : डॉ. ढवण

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठही मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा तयार करून त्यांची विक्री व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
Farmers need to be self-sufficient in seeds: Dr. Dhawan
Farmers need to be self-sufficient in seeds: Dr. Dhawan

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठही मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा तयार करून त्यांची विक्री व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथे रब्बी हंगामासाठीची ७० वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. ८) झाली. वनामकृविचे संचालक संशोधन डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘येणाऱ्या विविध आव्हानांचा अभ्यास करून विद्यापीठ संशोधन व विस्‍तार कार्य अखंडपणे कार्यरत आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.’’  

डॉ. वासकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या बायोमिक्स, ट्रायकोकार्ड यांचे संशोधन करून युनिट सुरू करण्यात आले. ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्र येथे ट्रायकोबुस्टची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या काळात परभणी येथे ज्वारी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये ज्वारीचे विविध वाण तसेच ज्वारीची प्रक्रिया उद्योग या विषयी मार्गदर्शन होईल. विद्यापीठ सोयाबीनचे उन्हाळी उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेत आहे. ज्यामध्ये विद्यापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.’’ 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी करडई, जवस, सूर्यफूल या पिकाकडे वळावे. या पिकांचे विद्यापीठ विकसित खूप चांगले वाणही उपलब्ध आहे. त्यांचे बियाणे देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. हरभरा या पिकांमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर ही अत्यंत फायदेशीर आहे. विविध शिफारशित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करून कडधान्य, तेलबिया इत्यादी पिकांचे उत्पादन वाढवावे.’’

एनएआरपी औरंगाबादद्वारे विकसित ट्रायकोकार्ड, केव्हीके औरंगाबादद्वारे विकसित हळद पावडर, मिरची पावडर, आवळा कँडी इत्यादी उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com