परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलन

आंदोलन
आंदोलन

कोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन पीक उत्पादकांना पीकविमा तातडीने द्यावा यायासह अन्य मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १५) येथे ठिय्या आंदोलन करून बेमुदत उपोषणास सुरवात केली. हक्काची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.  कडक उन्हात डांबरी रस्त्यावर दुपारपासून शेतकरी उपोषणास बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली, यामुळे सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच होते. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याबाबत श्री. पाटील यांच्या कार्यालयाने प्रयत्न सुरू ठेवले होते, पण आंदोलनकर्त्यांनी चर्चा न करण्याची भूमिका घेतली होती. किसान संघटनेचे विलास बाबर म्हणाले,  ६१ हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी ९५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील सोयाबीनचा पीक विमा भरला आहे. पाचशे किमी अंतर कापून आम्ही येथे आलो आहोत, शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही. ज्या रिलायन्स कंपनीला हाताशी धरून सरकारी यंत्रणा विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहे. अधिकाऱ्यांनी कापणीचे प्रयोग खोटे दाखवून कंपनीचा फायदा देण्याचा उद्योग केला. नागपूर येथे बैठक झाली. चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी भावांना मुंबईला गेलो की तुमचे पैसे देतो. वर्ष झाले. ३१ ऑक्‍टोबरला पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र ५ महिने झाले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी आश्‍वासन दिले होते का, असा जाब विचारण्यासाठी पाचशे किलोमीटरवरून शेकडो शेतकरी आलो आहे. जोपर्यंत आमच्या हक्‍काच्या विम्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com