खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला

खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला
खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला

जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील पीकविमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी पन्नास ते साठ हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीकविमा काढत नसत. यंदा मात्र तब्बल १ लाख ६१ हजार ८२४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. यंदा ६५१ कोटी ६३ लाख ७ हजार ३३४ रुपयांचा विमा संरक्षित केला आहे. विम्यापोटी शेतकऱ्यांनी ३१ कोटींचा प्रीमिअम जमा केला आहे. पंतप्रधान शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत ही कार्यवाही झाली आहे.  

गतवर्षापर्यंत पाऊस चांगला नव्हता. यामुळे शेतकरीही पीकविमा काढण्याकडे रस घेत नव्हते. यंदा मात्र शेतकऱ्यांनी पीकविमा काढून होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी प्रयत्न केलेला आहे. खरिपातील सर्वच पिकांचा विमा शेतकऱ्यांना काढावा यासाठी कृषी विभागाने ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीकविम्याचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांना या ना त्या माध्यमातून पीकविमा कसा योग्य आहे. 

पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कशी मिळते, याबाबत योग्य मार्गदर्शन केल्याने शेतकरी पीकविमा काढण्यास तयार होऊन त्यांनी पीकविमा काढला. पीकविमा काढलेल्या पिकांमध्ये मुख्यतः शेतकऱ्यांनी कपाशीला अधिक प्राधान्य दिले. त्याखालोखाल मका, ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांचा यंदा पीकविमा काढण्याकडे कल दिसून आला. शेतकऱ्यांना आम्ही पीकविम्याचे महत्त्व पटवून दिले. यामुळे एक लाख साठ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. ही सर्वांत मोठी बाब आहे.  - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com