शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्याला प्राधान्य : भुजबळ

शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्याला प्राधान्य : भुजबळ
शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्याला प्राधान्य : भुजबळ

नाशिक  : कांदा दरवाढ झाल्यानंतर दर नियंत्रित करण्यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने निर्यातबंदी केली. तर इतर कांदा उत्पादक देशांमधून कांद्याची आयात केली. अलीकडेच कांदा आयात होऊन आलेली बोट मुंबई बंदरात आली आहे. हा कांदा राज्य सरकारने घ्यावा, असा केंद्र शासनाचा आग्रह आहे. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी या कांद्याची पाहणी केली. मात्र कांदा खराब असल्याने शेतकऱ्यांचा चांगला कांदा सोडून खराब कांदा मी कशाला घेऊ, असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. श्री. भुजबळ यांनी सकाळ कार्यालयाला भेट दिली, या वेळी त्यांना कांद्याच्या पुरवठ्याबाबत विचारले असता. त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, माझ्या येवला मतदारसंघात सगळीकडे कांदाच आहे. कांदा कसा असतो हे मला कळते. केंद्र शासनाने मागवलेला जो कांदा मुंबई बंदरात पोचला आहे. त्याला कोंब फुटून तो बंदरात खराब झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. हा कांदा आकाराने मोठा आहे. हा कांदा घेऊन तो स्वस्त धान्य दुकानांमार्फत ग्राहकांना विक्री करावा असा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे. मात्र ते शक्‍य होणार नाही, असे सगळ्यांचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले.  श्री. भुजबळ पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघात सगळीकडे कांदा होतो. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. येथे सगळे शेतकरी कांदा उत्पादक आहेत. त्यामुळे कांदा कसा असतो हे मला कळते. त्यामुळे हा कांदा मी कसा घेणार? हा कांदा घेण्यास आम्ही नकार दिला आहे. त्याची काय विल्हेवाट लावायची ती संबंधितांनी लावावी, असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com