जळगाव : शेतकऱ्यांना भारनियमनाचा फटका

शेतकऱ्यांना भारनियमनाचा फटका
शेतकऱ्यांना भारनियमनाचा फटका

जळगाव : पूर्वहंगामी कापूस लागवडीसह मृग बहरातील केळी लागवडीची तयारी सुरू आहे. अशा वेळी भारनियमन व अखंडित वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप नादुरुस्त होण्यासह इतर अडचणी येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

शिवारात पाणीटंचाई असल्याने अनेक भागांत पूर्वहंगामी कापूस लागवड शेतकरी टाळत आहेत, परंतु तापी व गिरणा नदीकाठी जलसाठ्यांची स्थिती बरी आहे. या भागात शेतकरी पाण्याचा काटसरीने वापर करण्यावर भर देऊन कापूस लागवडीची तयारी करीत आहेत. परंतु भारनियमन व मध्येच बंद होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप बंद असतात. वीजपुरवठ्याचे वेळापत्रक विविध भागांत वेगवेगळे आहे. चार दिवस दिवसा व दोन दिवस रात्री वीजपुरवठा केला जातो. दिवसा वीज मध्येच बंद केली जाते. कमी दाबाने वीजपुरवठा केला जातो. यामुळे कृषिपंपांमध्ये बिघाड होतात. 

कूपनलिकांमधील पंप काढायला दुरुस्त करण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये खर्च येतो. यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दिवसा आठ तास वीजपुरवठा अपेक्षित असतो, परंतु किमान अर्धा ते एक तास कमी वीज मिळते. यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर या सर्वच भागांमध्ये वीजपुरवठ्यासंबंधीची अडचण आहे. यामुळे नवीन केळी लागवडीसह पूर्वहंगामी कापूस लागवडीला ‘ब्रेक'' बसत आहे. 

जळगाव तालुक्‍यातील पिलखेडा, कुवारखेडा, नंदगाव, फेसर्डी, गाढोदे, फुपणी भागातील शेतकऱ्यांनी या संदर्भात वीज कंपनीला निवेदन दिले. परंतु पुन्हा वीजपुरवठ्याची अडचण वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवार ते गुरुवारी दिवसा वीजपुरवठा केला जातो. शुक्रवार व शनिवारी रात्री वीज मिळते. रविवारी वीज बंद असते. परंतु घोळ वाढल्याने या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा कंपनी करीत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com