सांगलीत एफआरपीची प्रतीक्षा

सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचे मान्य केले आहे.हंगाम सुरु होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी, एकाही कारखानदारांनेएक रकमी एफआरपी दिली नाही.
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षा Farmers in Sangli waiting for FRP
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षा Farmers in Sangli waiting for FRP

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचे मान्य केले आहे. पंरतु, गाळप हंगाम सुरु होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी, साखर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याबाबत हालचाली केल्या नसल्याचे चित्र आहे. एका बाजूला एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले असताना मग शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा का केली नाही, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी करू लागले आहे. यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत केली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. कडेगाव येथे एक रकमी एफआरपी देण्याबाबात दोन बैठका झाल्या. पहिली बैठक निष्फळ ठरली. लगेच पुढच्या पाच दिवसांत दुसरी बैठकीचे नियोजन केले. त्यामुळे साखर कारखाना आणि संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याने एक रकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे, मग सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने या तयार होत नाहीत, असा सवाल उपस्थित  केला.  दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करून सुमारे पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. परंतु साखर कारखानदारांकडून एक रकमी एफआरपी देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळणार का? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

एफआरपीचे तुकडे? जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून एफआरपी देण्याबाबत घोषणा केली जाते. परंतु, ज्यावेळी एफआरपी देण्याची वेळ येत त्यावेळी कारखानदारांकडून एफआरपीचे तुकडे केले जातात, हे दरवर्षी घडते. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याची जाहीर केले असले तरी, एफआरपीचे तुकडे होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कोल्हापुरात एफआरपी जमा करण्यास सुरुवात

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून साखर कारखाने एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करित आहेत. अप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), संताजी घोरपडे (कागल), हेमरस (राजगोळी खुर्द),  शाहू साखर कारखाना (कागल), दुधगंगा वेदगंगा (बिद्री), जवाहर (हुपरी), दत्त (शिरोळ) कारखान्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना ऊसतोड झाल्यानंतर चौदा दिवसांत एफआरपी द्यावी, असा कायदा आहे. त्यानुसार या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित कारखाने ही एफआरपी जमा करतील अशी शक्यता आहे.

प्रतिक्रिया

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. परंतु, सांगलीतील कारखान्यांनी या बाबत हालचाली केलेल्या नाहीत. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही, तर आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.

 -महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com