सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेत 

सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेत 
सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेत 

सातारा ः ऊस गाळप होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असतानाही अजूनही पहिला हप्ता कोणीच जमा केलेला नाही. साखरेचे दर कमी झाल्याने पूर्ण एकरकमी एफआरपी मिळणार नसल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांना पहिल्या उचलीबाबत चिंता निर्माण झाली आहे.  

राज्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू आहे. राज्यात सोमवार (ता. १७) अखेर ३११.६७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ३१९.९८ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळाच्या तुलनेत साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे. राज्यात सरासरी १०.२७ टक्के साखर उतारा मिळत आहे. हा हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. तरीही कोणत्याही साखर कारखान्याने पहिली उचल दिलेली नाही. 

१४ दिवसांत पहिली उचल देण्याचा कायदा असतानाही साखर कारखान्यांनी मौन पाळले आहे. हंगामाच्या सुरवातीस प्रशासनाकडून आयोजित बैठकीत कारखाना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. यानंतर मात्र साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्यांकडून मौन पाळले गेले आहे. दर कमी झाल्याने एक रकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचे कारखाने खासगीत बोलले जात आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना दोन ते तीन प्रकारचे वेगळे दर मिळाले होते. 

तशीच परिस्थिती आताही होते की काय असे वाटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनेचे पहिल्या उचलीवर लक्ष ठेऊन आहे. ठरावानुसार एक रकमी दर कारखान्यांकडून लवकरात द्यावा. यापेक्षा कमी दराने बिले दिली जाण्याच्या शक्यतेने व्यक्त केली जात असल्याने शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.  

व्हॉट्सअॅपवर चुकीचे मेसेज ऊस हंगाम सुरू होऊन पहिली उचल कोणीच दिलेली नाही. पहिली उचल कधी व कोण देणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. काही जणांकडून व्हॉट्सअॅपवर खोडसाळपणा केला जात आहे. अजूनही कोणत्याही कारखान्याने पहिली जमा केलेली नसतानाही मागील हंगामातील दराच्या प्रतिमा (इमेज) किंवा पहिली उचल तीन हजार; तसेच अध्यक्ष उपाध्यक्षाचा फोटो टाकून नवीन प्रतिमा तयार करून शेअर केल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांत गैरसमजाचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकारचा गैरसमज करणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्यावर करावाईची मागणी होत आहे.

स्वाभिमानीची आयुक्ताकडे मागणी  जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी २०१८-१९ चा गाळप हंगाम सुरू होऊन एक ते दीड महिना झाला आहे. तरीही अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले अदा केली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्त, पुणे यांना साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांनी आपला ऊस ज्या कारखान्याला गाळपास देऊन १४ दिवस होऊन झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना स्वतः पुढे येऊन संबंधित कारखान्यावर गुन्हे नोंद करावेत. गुन्हे नोंद शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी ठामपणे उभी राहील. - सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com