शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार रुपये मदत देण्याची मागणी

शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार रुपये मदत द्यावी
शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार रुपये मदत द्यावी

नगर : सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कापसासह बहुतांश रब्बीतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त असून, ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी विकास मंडळाने तहसीलदाराकडे केली आहे. 

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह चंद्रकांत निकम, गंगाधर चोपडे, सुभाष टेकळे, गणेश सातपुते, अनिकेत गोसावी, सुभाष शिंदे, भूषण गिरमकर, दीपक रुईकर, दत्ता माळवदे, यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे.  

शेतकरी मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘‘नगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वच पिकावर गंभीर परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. शिवाय, बाजरीचे ही उत्पादन घेतात कापूस आणि बाजरीचे या पावसाने पूर्णतः नुकसान झालेले असून, प्रशासन पंचनामे करत आहे. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर मदतीचा विचार होईल. आजची स्थिती गंभीर असल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या तातडीने हेक्‍टरी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com