शेतकऱ्यांनी कमी दराने कापूस विकू नये : पणनमंत्री पाटील

शेतकऱ्यांनी गडबड घाई करून व्यापाऱ्यांना कापूस विक्री करू नये, राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करेल.
balaseheb patil
balaseheb patil

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने कापूस खरेदी केंद्रे सुरू करीत आहोत. मंगळवारअखेर राज्यात सुमारे ३,८०० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, शेतकऱ्यांनी गडबड घाई करून व्यापाऱ्यांना कापूस विक्री करू नये, राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करेल, असे आश्‍वासन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. मंत्री पाटील म्हणाले, की सीसीआय आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून राज्य शासनाने राज्यात कापूस खरेदी सुरू केली आहे. कापूस उत्पादक भागात काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी काही वेगळे आदेश काढले असल्याने खरेदीत अडचणी येत आहेत. तसेच कोरोनामुळे कापूस उतरून घेण्यासाठी मजुरांची मोठी समस्या आहे, मजूर कामावर येत नाहीत, त्यामुळे देखील खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, या कारणांमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी गडबड घाई करून व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस विक्री करू नये, राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे असा दिलासा मंत्री  पाटील यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com