शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'ला पोलिसांनी रोखले

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'ला पोलिसांनी रोखले
शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'ला पोलिसांनी रोखले

नवी दिल्ली : संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, थकलेले पेमेंट आदी मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे 'लॉंग मार्च'च्या माध्यमातून कूच करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सिमेवर पोलिसांनी पाण्याचा मारा करुन आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून रोखले. भारतीय किसान युनियन (बीकेयु) च्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातील विविध राज्यातील हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीकडे निघाले होते.  शेतकऱ्यांचा 'दिल्ली मार्च' रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडथळे निर्माण केले होते. मात्र ते बॅरिकेट्स मोडून शेतकऱ्यांनी अापली कूच सुरुच ठेवली. यावेळी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी न बधल्याने पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलनकर्त्यांना पांंगविण्याचा प्रयत्न केला.  हरिद्वार येथून निघालेल्या या मोर्चाला राजधानी येण्यापासून प्रतिबंधीत करण्याकरिता पोलिसांनी अगोदरच १४४ कलम ८ अॉक्टोबरपर्यंत लावले होते.  ' सरकारच्या कृतीचा निषेध' 

गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया...

डॉ. नवले म्हणाले, की सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या, अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचा वारंवार विश्वासघात करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे.

वारंवार होणारा विश्वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा  शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लॉंग मार्च काढणार आहेत. दिल्लीच्या चारही बाजूने चार लॉंग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढयाची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी व विश्वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com