द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

फवारणीचा खर्चामध्ये बचत करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर खरेदीच्या मानसिकेत अनेक शेतकरी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासनाने छोटे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सवलतीच्या दारात उपलब्ध करून द्यावेत. - लक्ष्मण बनसोडे, द्राक्षे बागायतदार, पांगरी, जि. सोलापूर
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व उत्तरेकडील भाग हा द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर आहे. अल्प पावसामुळे वर्षानुवर्षे जोपसलेल्या द्राक्षे बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षेची जागा भाजीपाल्या पिकांनी घेतली. मात्र त्यात ही खर्चाच्या तुलनेत उत्पादन, बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. आता पुन्हा शेतकरी द्राक्षे बागेकडे वळला आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार नव्याने संशोधित द्राक्षे पिकांची लागवड होऊ लागली आहे. पुरेसे पाणी नसतानादेखील विहिरी, विंधन विहिरीचा आधार घेऊन या बागा जगविण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. एप्रिल महिन्यापर्यंत पुरणारे पाणी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये संपू लागले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर आहे. द्राक्षांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. द्राक्षे विक्रीचा हंगामास नुकतीच सुरवात झाली आहे. वातावरणात वेळोवेळी निर्माण होत असलेला गारठ्यामुळे द्राक्षास बाजारभावावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

१९९० च्या दशकात पांगरीसह, कारी, नारी, गोरमाळे, जहानपूर, ममदापूर, पांढरी, शिराळे, पाथरी, चिंचोली आदी भागांत द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. यात थाॅमसन, माणिकचमन, शरद सीडलेस, सुपर सोनाका या प्रमुख जातींचा समावेश होता. निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन घेतल्याने ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत होते. मात्र दिवसेंदिवस पाऊसाचे प्रमाण कमी होत गेल्याने, वातावरणातील बदलामुळे द्राक्षे क्षेत्र कमी झाले. 

नव्याने २०० एकरांवर लागवड

सध्या सुधारित जातीच्या द्राक्षे पिकांचा शोध घेऊन त्याच्या लागवडी होत आहेत. नव्याने जवळपास दीडशे ते दोनशे एकरांवर लागवड झाली आहे. या बागाची मशागतीत यंत्रीकीकरणाचा वापर होत आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने बागेमध्ये फवारणी केली जात आहे.

यंदा दुष्काळ तीव्र आहे. मागील दुष्काळी परिस्थितीत मार्च, एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईस सामना करावा लागत होता. मात्र या वर्षी जानेवारीपासूनच पाण्याची पातळी कमी झाली आहे. विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com