'शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत'

शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत
शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत

नगर : सरकार बदलत राहिले, शेतकरी विरोधी कायदे वरचेवर वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.  लोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथे शेतकरी संघटेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तीनदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १५) झाले. अध्यक्षस्थानी सरपंच रेणकू बेल्हेकर होते. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.   श्री. पाटील म्हणाले, की गेल्या कित्येक वर्षांपासून सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. मागील सरकार शेतकरी विरोधी होते म्हणून या सरकारला शेतकऱ्यांनी निवडून दिले. मात्र या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली. शेतकरी विरोधी कायदे घात करीत आहेत. शेतकरी आत्महत्या होण्याला हे कायदे कारणीभूत आहेत. त्याचा आता कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर तीन दिवस सुरू राहणार असून, सोमवारी (ता. १७) त्याचा समारोप होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com