यवतमाळ जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ   ः जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या तालुक्‍यांतील ३ लाख ५० हजार १४८ शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा फटका बसला आहे. यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्‍क्‍यांवर असून, एक लाख शेतकऱ्यांचे ३३ ते ५० टक्‍के नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने सादर केला आहे.

जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानाचा फटका शेतकऱ्यांना बसला. पावसाअभावी सोयाबीन पीक हातचे गेले. कापूस व तुरीचे उत्पादनही घटण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९ तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्याआधारे कृषी विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावात ३३ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंतच्या नुकसानीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यवतमाळ, बाभूळगाव, दारव्हा, कळंब, राळेगाव, मारेगाव, केळापूर, महागाव व उमरखेड या तालुक्‍यांचा दुष्काळ यादीत समावेश आहे. या तालुक्‍यातील ३ लाख ५० हजार १४८ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. त्यातील २ लाख ४७ हजार ५२६ शेतकऱ्यांचे ५० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले असून, एक लाख २ हजार शेतकऱ्यांचे ३३ ते ५० टक्‍के नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. हा प्रस्ताव दाखल झाला असतानाच नऊऐवजी संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात साडेनऊ लाख हेक्‍टरवर खरिपाचा पेरा झाला. त्यातील पाच लाख हेक्‍टरला दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. या भागातील पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com