देशभरात ‘रेल रोको’ करू : आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

कृषी कायद्यांच्या विरोधात गेले १५ दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेचे आवतण सरकारने पुन्हा दिले असतानाच शेतकरी संघटना मात्र तिन्ही कायदे रद्द करा, या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्यास देशभरात रेल्वे रोको करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी गुरूवारी (ता.१०) दिला.
देशभरात ‘रेल रोको’ करू : आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
देशभरात ‘रेल रोको’ करू : आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांच्या विरोधात गेले १५ दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेचे आवतण सरकारने पुन्हा दिले असतानाच शेतकरी संघटना मात्र तिन्ही कायदे रद्द करा, या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्यास देशभरात रेल्वे रोको करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी गुरूवारी (ता.१०) दिला. सरकारचे लेखी प्रस्ताव कालच फेटाळणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आजच्या बैठकीनंतर सांगितले की, आम्ही सरकारला कायदे रद्द करण्यासाठी दहा डिसेंबरची मुदत दिली होती. पण सरकारची आठमुठी भूमिका आहे. सरकारने आमची मागणी ऐकली नाही व कायदे रद्द केले नाहीत तर, लवकरच साऱ्या भारतातील रेल्वे रूळांवरही धरणे आंदोलने सुरू करू. सारी रेल्वेवाहतूक ठप्प पाडली जाईल, असा कडक इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. संयुक्त शेतकरी संघर्ष समिती लवकरात लवकर देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनाच्या तारखेची घोषणा करेल असेही सांगण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीचे नेते बुटासिंग यांनी सांगितले की, आम्ही सरकारला कायदे रद्द करण्यासाठी आजची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकार, चर्चा करू, दुरूस्त्यांबाबत विचार करू हेच पुन्हा सांगत असेल तर काही फायदा नाही. आता देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असा निर्णय आजच्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. पंजाबमधील सर्व टोल नाके, मॉल, रिलायन्सचे पेट्रोलपंप, जिओची मोबाईल दुकाने, भाजप नेत्यांची घरे व कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाईल.

शेतकऱ्यांची एकजूट भक्कम थंडीचे दिवस व कोरोना महामारीमुळे सरकारला आंदोलनाबाबत कळवळा वाटल्याचे दाखवले जाते त्याबद्दलही शेतकरी नेत्यांनी रोष व्यक्त केला. शेतकरी जमिनीत कष्ट सरतच असतो. तेव्हाही थंडी असेत व विविध साथीही येतात. शेतकरी त्यांना तोंड देण्यासाठी मजबूत असतो तसा यावेळीही आहे, असे राकेश टिकैत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी आज सांगितले की, सरकारतर्फे जे लेखी प्रस्ताव दिले होते त्यात वेगळे काहीही नाही. सरकार कायदेदुरूस्त्या म्हणते व शेतकरी त्यासाठी अजिबात तयार नाहीत. तिन्ही कायदे रद्द करण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. शेतकऱ्यांची एकजूट भक्कम आहे. प्रतिक्रिया... सरकारला कायदे रद्द करण्यासाठी आजची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकार, चर्चा करू, दुरूस्त्यांबाबत विचार करू हेच पुन्हा सांगत असेल तर काही फायदा नाही. आता देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाईल. - बुटासिंग , शेतकरी संघर्ष समितीचे नेते 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com