शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई मिळणार

शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई मिळणार
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई मिळणार

नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची जिल्ह्याची रक्कम प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यांतील ३८ हजार शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.

नुकसानभरपाईच्या उर्वरित ८ कोटी ७७ लाख रुपयांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्याने शासनाने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. कापसाच्या वाणामुळे गेल्या वर्षी कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतातील उभे पीक या अळीने फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. सरकारने नुकसानग्रस्तांना दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे जाहीर केले होते. सात तालुक्यांतील ५३,३९३ शेतकऱ्यांच्या ३५,९४७ हेक्टर पिकाचे नुकसान झाले होते. त्यानुसार २६ कोटी ३३ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती.

शासनाने १४ मे रोजी ७ कोटी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता पाठविला होता. त्यानंतर १० कोटी ५४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अनुदानातून १५ हजार ३३० शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. त्या वेळी येवला व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात रक्कम देण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com