पुणे ः पुणे जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ हवामान तयार होत आहे. यामुळे शेती पिकांवर परिणाम होत आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिकांबरोबरच भाजीपाला पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, थंडी आणि दाट धुके यामुळे ज्वारी पिकाला फटका बसत आहे. ज्वारी जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. आता ढगाळ हवामानामुळे पिकांना फटका बसत आहे.
प्रामुख्याने गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रादुर्भावामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. याबरोबरच वालवड, पापडी, घेवडा पिकांनादेखील फटका बसत आहे.
आंबा, द्राक्ष, डाळिंब पिकांना अधिक धोका पोचतो. याशिवाय हरभरा, गहू, ज्वारी पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढत असून, गव्हावर तांबेरा, ज्वारीवर चिकटा आणि हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे फवारणीच्या खर्चात वाढ होत असल्याचे चित्र आहे. - बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.