खानदेशात कांदा पिकातील रोगराईने शेतकरी चिंतातूर

जळगाव : खानदेशातील कांदा लागवड जेमतेम आहे. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोग आल्याने नुकसान होत आहे. यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी स्थिती आहे.
 Farmers worried about onion crop disease in Khandesh
Farmers worried about onion crop disease in Khandesh
   जळगाव : खानदेशातील कांदा लागवड  जेमतेम आहे. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोग आल्याने नुकसान होत आहे. यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी स्थिती आहे.      अधिकचा खर्च यंदा आला आहे. कारण, बियाणे २२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. रोपांचा तुटवडा होता. खानदेशात लागवड स्थिर आहे. परंतु, यंदा खर्च अधिक आला. एकरी किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च यंदा आला आहे. अतिपावसात किंवा उष्णतेत रोपांचे नुकसान झाल्याने अनेकांना रोपांची नव्याने खरेदी करावी लागली.   रोपांसाठी खानदेशातील शेतकरी नाशिकमधील मालेगाव, सटाणा, नगरमधील पारनेर, संगमनेर, नेवासा, औरंगाबाद जिल्ह्यातही पोचत होते. एक किलो बियााण्याच्या दर्जेदार रोपांसाठी १५ हजार रुपये द्यावे लागले. खानदेशात सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित होती. त्यात एकट्या धुळे जिल्ह्यात १० ते ११  हजार हेक्टरवर लागवडीची शक्यता होती. पण, खानदेशात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे.   आता पिकात रोगराई आहे. खानदेशात धुळ्यातील धुळे, साक्री, जडळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, जळगाव, एरंडोल, अमळनेर हा भाग, तर नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर भाग कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात कांदा रोपे, बियाण्याचे सुरवातीला नुकसान झाले. आता लागवडीनंतर मर रोग आला आहे. अनेक भागात अतिपाऊस झाला. त्यामुळे लागवडीनंतर हे नुकसान झाले आहे.   सध्या सकाळी धुके व अधिक आर्द्रतायुक्त वातावरण असते. ३० ते ३५ दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांदा पिकात पात पिवळसर व नंतर पांढरी होऊन जमिनीवर पडत आहे. रोपे कमकुवत होवून नुकसान होत आहे.  लागवड केलेली रोपे जमिनीवर लोळत आहेत. त्यांची वाढ चांगली नाही. उत्पादन हाती येणार की नाही, अशी चिंता आहे.     ही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. त्यासाठी मोठा खर्च  येत आहे. रोपांचे किंवा पिकाचे नुकसान होत असल्याने पीक विरळ होत आहे. अर्थात उत्पादन कमी होईल. जो खर्च केला, तो पूर्ण मिळेल, की नाही, अशी स्थिती आहे.    

यंदा कांदा रोपे किंवा बियाण्याचे जूनमध्ये अतिउष्णता, अतिजोरदार पावसाने नुकसान झाले. लागवड शेतकऱ्यांनी कशीबशी पूर्ण केली. पण, आता रोगराई किंवा मर रोग येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, उत्पादतेवर परिणाम होईल.  - आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, (जि.धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com