खानदेशात दुष्काळी भागांत शेतसाऱ्याची वसुली

खानदेशात दुष्काळी भागांत शेतसाऱ्याची वसुली
खानदेशात दुष्काळी भागांत शेतसाऱ्याची वसुली

जळगाव  : खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा हे तालुके वगळता सर्वत्र दुष्काळ आहे. दुष्काळात शेतसारावसुली न करण्याचा आदेश शासनाने देऊनही प्रशासनाची महसूलवसुली सुरूच आहे. त्यामुळे आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. 

सरपंच, पोलिस पाटील व इतर मोठ्या शेतकऱ्यांची मदत घेऊन तलाठ्यांनी आपले वसुलीचे उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य केल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने १०४ टक्के वसुली केली. या जिल्ह्याला यंदा १२९ कोटी २२ लाख ८७ हजार रुपये महसुली उत्पन्न वसुलीचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा प्रशासनाने १३१ कोटी ६६ लाख ८६ हजार एवढे उद्दिष्ट (१०४ टक्के) पूर्ण केले. धुळे व नंदुरबारातही ही वसुली जोमात सुरू आहे. तेथेही ६० टक्‍क्‍यांवर वसुली झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. धुळे व नंदुरबारमधील साक्री, धडगाव व अक्कलकुवा भागातच पावसाचे प्रमाण बरे होते. उर्वरित भागात पावसाचा मोठा खंड पडला. दुष्काळी स्थितीत शेतकरी कुठलाही कर देऊ शकत नाहीत, तरीही ही वसुली सुरू आहे.

साताबारा देताना अडवणूक किसान सन्मान योजनेच्या याद्या, दुष्काळी मदतीसाठी बॅंक खाते क्रमांक, शेतीचे गट क्रमांक आदी माहिती शेतकऱ्यांकड़ून गोळा करताना प्रशासनाने ही शेतसारावसुली केली. ग्रामपंचायतीत तलाठी यायचे, वसुली सुरूच होती. सातबारा उतारा देताना शेतसाऱ्याची मागणी केली जात होती. अजूनही असे प्रकार यावल, शहादा, जळगाव, चोपडा भागांत सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com