नगर ः नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांसाठी खतांची पावणे तीन लाख टन मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सव्वा दोन लाख टन खतांचे आवंटन मंजूर झालेली आहे. त्यापैकी एक लाख ६५ हजार ९०५ टन खते उपलब्ध झाले असून त्यातील ३४ हजार ५२१ टन खतांची विक्री झाली आहे. सध्या एक लाख ३१ हजार ३८४ टन खते शिल्लक आहे. खरिपात सर्वाधिक मागणी असलेला युरियाही सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
जिल्ह्यात यंदा पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होईल आणि त्या तुलनेत खतालाही मागणी वाढेल, असा अंदाज गृहीत धरुन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी दोन लाख ७८ हजार ९८५ टन खताची मागणी केली होती. त्यानुसार दोन लाख २३ हजार ५१० टन खते पुरवठ्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी आत्तापर्यंत रब्बीसाठी एक लाख ६५ हजार ९०५ टन खते उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील फक्त ३४ हजार ५२१ टन खतांची विक्री झाली आहे.
सध्या जिल्ह्यात एक लाख ३१ हजार ३८४ टन खते शिल्लक आहे. सध्या खताला मागणी कमी असल्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवाकेंद्रांमध्ये खतांची उपलब्धता दिसून येत आहे. खरिपात युरिया खताला अधिक मागणी होती. त्या तुलनेत पुरेसा युरिया उपलब्ध होत नसल्याने जास्ती दराने खरेदी करावी लागत असल्याची जिल्हाभरातून ओरड होती. रब्बीत मात्र युरियाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग दक्ष शेतकऱ्यांना खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. खताचा काळाबाजार होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. कृषी विभागाचे पथक त्यासाठी कार्यरत असल्याचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.