साताऱ्यात खरिपासाठी एक लाख ३० हजार टन खतांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४८ हजार ५९२ क्विंटल बियाण्यांची तसेच एक लाख ३० हजार टन खतांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

जिल्ह्यात कमालीची उष्णता वाढली असल्याने पेरणीपूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. पेरणीस पोषक वातावरण होण्यासाठी मॉन्सूनची आस शेतकऱ्यांना लागली आहे. खरिपात तीन लाख ४२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा, कऱ्हाड, जावली, महाबळेश्वर, वाई, पाटण या पूर्वेकडील तालुक्‍यांचा खरीप हा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यांत सर्वाधिक पेरणी होणार आहे.

पिकांमध्ये सोयाबीनची सर्वाधिक ७७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज असल्याने १७,५१८ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली होती. बाजरी पिकाची ७२ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून त्यासाठी १७२८ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. भात पिकाची ५० हजार हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज असून १३,००० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. खरीप ज्वारीची २५ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून यासाठी ७५०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

कृषी विभागाकडून खरिप हंगामासाठी एक लाख ३० हजार टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी यांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com