नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’ योजनेसह ‘आत्मनिर्भर भारत’च्या तिसऱ्या टप्प्यात जाहीर केलेल्या ‘शेती सुधारणेचे आठ टप्पे’ या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सुधारणा करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या सुधारणांचे कौतुक आहे. मात्र केंद्र सरकारने या सुधारणांचा शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून आढावा घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनने (एफएआयएफए) केली आहे. ‘एफएआयएफए’ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. ‘एफएआयएफए’ केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या शेतमाल विक्रीसंदर्भात काढलेल्या फारर्मर्स ट्रेड ॲण्ड कॉमर्स (प्रमोशन ॲण्ड फॅसिलिटेशन) ऑर्डिनन्स, २०२०, द फार्मर्स (एम्पावर्मेंट ॲण्ड प्रोटेक्शन) ॲग्रीमेंट ऑन प्राइस अशुरन्स ॲण्ड फार्म सर्व्हिसेस ऑर्डिनन्स, २०२० आणि द इसेन्शल कमोडीटी (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, २०२० संदर्भातही शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने आणलेली पुरोगामी धोरणे योग्यपणे राबविण्यासाठी योग्य पावले उचलावी आणि या धोरणांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. ‘एफएआयएफए’ चे अध्यक्ष जावारे गौडा म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या सुधारणांचे आम्ही कौतुक करतो. देशभरातील शेतकऱ्यांना या सुधारणांचा फायदा होण्यासाठी सरकार योग्य पावले उचलून अंमलबजावणी करेल, अशी आशा आहे. सरकारने या धोरणांचा शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणि शिक्षणाचा प्रसार करावा. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या धोरणांविषयी अपप्रचार होणार नाही आणि त्यांना योग्य फायदा मिळेल. ‘एफएआयएफए’ने मांडलेले मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.