पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात अल्पावधीतच बिघाड

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या कृषी पंपात अल्पावधीतच बिघाड झाला. त्याची दुरुस्ती किंवा ते बदलून देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
Fifteen farmers' solar pumps fail in a short time
Fifteen farmers' solar pumps fail in a short time

चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या कृषी पंपात अल्पावधीतच बिघाड झाला. त्याची दुरुस्ती किंवा ते बदलून देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सौर कृषी पंपाचा पुरवठा करण्यात आला. गोंडपिंपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसविले. परंतु सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच या कृषी पंपात बिघाड झाला आहे. शेतकऱ्यांनी तीन अश्वशक्ती करिता १४ हजार रुपये, एसएसपीला २४ हजार ७०० रुपये भरून हे पंप बसविले. परंतु अल्पावधीतच बिघाड झाल्याने हंगामात पिकाला पाणी देणे अडचणीचे ठरत आहे.

या संदर्भाने संबंधित कंपनी तसेच महावितरण अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील १५ शेतकऱ्यांचा तक्रारदारांमध्ये समावेश आहे. परंतु जॉनी यंत्रणांकडून या तक्रारींची कोणत्या स्तरावर दखल घेतली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धान रोवणे सुरू असल्याने पाण्याची गरज आहे. परंतू पंप बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com