विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान 

विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान झाले. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नक्षलप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवास मिळाला.
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान  Fifty percent average turnout for Gram Panchayats in Vidarbha
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान  Fifty percent average turnout for Gram Panchayats in Vidarbha

नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान झाले. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नक्षलप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांचा ग्रामपंचायत निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवास मिळाला. सायंकाळपर्यंत ८० टक्के मतदानाची नोंद येथे झाली. ३२० पैकी १७० ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.  गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत नक्षलवाद्यांची दहशत राहते. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये मतदान घेण्यात आले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कुरखेडा, धानोरा या सहा तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये २० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पोलिसांनी निवडणूक प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणतेही नक्षलवादी कृत्य घडले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया प्रभावित झाली होती. त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. ९२५ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात मतदान झाले. सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७२ वर पोहोचवली होती. महागाव तालुक्यातील सवना येथे उमेदवाराला दारू वाटप करताना पकडण्यात आले. या प्रकरणी महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडेगाव येथे पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी असलेला दारूसाठा जप्त केला. या घटना अपवाद वगळता यवतमाळ जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. भंडारा जिल्ह्यात १४८ ग्रामपंचायत करता मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळपर्यंत ही टक्केवारी ७९ वर पोहोचवली होती. चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ पैकी २० ग्रामपंचायती अविरोध झाल्या. त्यामुळे ६०९ ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले होते. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळ पर्यंत हा आकडा टक्के ७८ टक्के गेला होता. विदर्भातील सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदारांचे तापमान नोंदवून त्यानंतरच केंद्रात सोडण्यात येत होते. त्या सोबतच काही मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथकांची नेमणूक देखील करण्यात आली होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com