नाशिक : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ३ सख्ख्या भावांचा विद्युत पंप चालू करताना शॉक बसून मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. महवितरणमुळे शेतकऱ्यांना जीवितास मुकावे लागत आहे. या प्रकरणी महावितरण व ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा तहसीलदार व महावितरणच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे केली.
राज्यात औद्योगिक वापरासाठी पूर्ण वेळ वीजपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्रातील शेती उद्योगावर ८० टक्के घटक अवलंबून असताना शेतकऱ्यांना २४ तासांतील फक्त ८ तास विद्युत पुरवठा केला जातो. त्यात चार दिवस रात्री-अपरात्री पुरवठा केला जातो. सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. त्यासाठी शेतीला पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. संघटनेचे प्रांतिक सदस्य दीपक पगार, जिल्हा उपाध्यक्ष डोंगर पगार, भाऊसाहेब पगार व वीरेंद्र पगार उपस्थित होते.
‘रयत’च्या मागण्या
पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
सटाणा तालुक्यातील तळवाडे या पाझर तलावाचे २५ वर्षांत डागडुजी न केल्यामुळे लाखो लिटर पाणी नदी पात्रात सोडावे लागले. कारण नसताना ३ शेतकऱ्यांवर कलम ३५३ अन्वvये गुन्हा दाखल केला. तो मागे घ्यावा. यासह पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभे करू. त्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.