'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'

'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'
'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी, आरएसएफ तसेच दंड व्याजापोटी कोट्यवधीची रक्कम अदा न करता ३९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांवर फुसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ऊसदर नियंत्रण मंडळातील शेतकरी सदस्यांनी साखर आयुक्तांकडे केली.  साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांना मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार, शिवानंद दरेकर, पांडुरंग थोरात यांनी निवेदन दिले. "राज्यात चालू हंगामात एकाही कारखान्याने १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. आयुक्तालयाची परवानगी न घेता बेधडक कारखान्यांचे गाळप सुरू केले आहे. त्यामुळे ही फसवणूक रोखावी,’’ असे सदस्यांनी आयुक्तांना सांगितले.  "एफआरपीबाबत आयुक्तालयाच्या स्तरावरून यापूर्वीच आदेश देण्यात आलेले आहेत. उच्च न्यायालयातदेखील याबाबत तक्रारी गेलेल्या आहेत. मात्र, न्यायालयात निश्चित काय कामकाज झाले किंवा कोणते आदेश जारी केले गेले याची माहिती आयुक्तालयात आलेली नाही. मंडळाच्या सदस्यांनी ही माहिती साखर संचालकांकडून घ्यावी,’’ असे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले. आयुक्तांच्या चर्चेनंतर मंडळाचे सदस्य शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वतः एफआयआर दाखल करण्यासाठी गेले.  दरम्यान, साखर संचालकांनी एका पत्रात नमूद केल्यानुसार महसुली उत्पन्न विभागणी सूत्रानुसार निघणारा दर शेतकऱ्यांना न दिल्यामुळे या कारखान्यांना गाळप परवाना न देण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.  साखर सहसंचालक एस. एस. क्षीरसागर यांनी जालना येथील अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करण्यासाठी विशेष लेखापरीक्षक रशीद शेख यांची नियुक्ती केली आहे. ते तीन महिन्यांत चौकशी अहवाल देतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com