‘ताकारी’, ‘म्हैसाळ’मधून तलाव भरा

सांगली ः जिल्ह्यात मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.
 Fill the lake with ‘Takari’, ‘Mhaisal’
Fill the lake with ‘Takari’, ‘Mhaisal’

सांगली ः  जिल्ह्यात मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. सध्या ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरु आहे.  तलाव भरुन दिले, तर भविष्यातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. त्यामुळे  या योजनेतून दोन्ही लाभ क्षेत्रातील तलाव पाण्याने भरुन द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून  पाणी टंचाई भासू लागते. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी सुरु होते. मात्र, गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने दुष्काळी पट्ट्यातील तलाव तुडूंब भरले होते. त्यामुळे पाणी टंचाई भासली नाही.

जिल्हा प्रशासनाला टॅंकर सुरु करावे लागले नाहीत. परंतू गेल्या महिन्याभरात या भागातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात जाणवू लागली असल्याचे चित्र आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची संख्या ८४ इतकी आहे. गेल्या दोन महिन्यात ३५ ते ४० टक्क्यांनी पाणी पातळी कमी झाली.

टेंभूचे पहिले आवर्तन सुरु होऊन बंद झाले. ताकारीचे दुसरे, तर म्हैसाळचे पहिले आवर्तन सुरु झाले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. मुख्य कालव्यातून शेवटच्या टोकापर्यंत पाणी दिले जाईल. मात्र, या योजनेच्या लाभ क्षेत्रात पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेच्या पाटंबधारे विभागाचे अनेक तलाव येतात. या तलावातील देखील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचनयोजना सुरु आहेत. या योजनेचे पाणी तलावात सोडून ते शंभर टक्के भरुन द्यावे, अशी मागणी होत आहे. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे

मार्च महिना निम्मा संपत आला. एप्रिल आणि मे असे अजून दोन महिने आहेत. टॅंकर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. योजनेचे पाणी तलावात सोडले, तर टॅंकरवचा खर्च टाळता येईल. त्यामुळे तलाव भरुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com