सातारा जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यांत 

सातारा जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यांत 
सातारा जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यांत 

सातारा ः कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले असले तरी ऊस गाळप हंगामास अजूनही फटका बसलेला नाही. जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यांत आला आहे. उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे तोडणीची कामे काहीशी मंदावली आहेत. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ६२ लाख ६८ हजार ५३० मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ७३ लाख ७८ हजार ८२० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. उसाचे क्षेत्र अजूनही शिल्लक असल्याने ऊस गाळप हंगाम लांबणार आहे.

जिल्ह्यातील साखर कारखाने आपले ठरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ६२ लाख ६८ हजार ५३० मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ७३ लाख ७८ हजार ८२० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. हा हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाच्या परिपक्वतेत वाढ झाल्याने साखर उताऱ्यात सुधारणा झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ११.७७ टक्के उतारा मिळत आहे. 

जिल्ह्यात गाळप, साखरनिर्मिती, साखर उताऱ्यात जरंडेश्वर कारखान्यांची आघाडी असून सह्याद्रीने सर्वाधिक २८५५ रुपये पहिली उचल देत सर्वाधिक दर दिला. एकूण गाळपात सात सहकारी कारखान्यांकडून ३२ लाख ९५ हजार २६६ मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ३९ लाख ९८ हजार १६५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. तसेच सात खासगी कारखान्यांकडून २९ लाख ७३ हजार  मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ३३ लाख ८० हजार ६५५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे.

एप्रिलअखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार मार्च महिन्यात अनेक कारखान्यांचा ऊस गाळप बंद होते. मात्र, एक महिना उशिरा गाळप सुरू झाल्याने अजूनही सर्व कारखान्यांचे गाळप सुरू आहे. अजूनही उसाचे क्षेत्र शिल्लक असल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com