गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा आदेश !

दुर्गंधीमुळे अखेरीस पोल्ट्री बंदचा आदेश
दुर्गंधीमुळे अखेरीस पोल्ट्री बंदचा आदेश

गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर लोकांकडून होणारा विरोध लक्षात घेत कंबलपेठा येथील पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिरोंचा तालुक्‍यातील कंबलपेठा गावाजवळ अंकिसा येथील रहिवासी व्यंकटेश्‍वर येनगंट यांनी कुक्‍कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. गावालगतच्या एका शेतात त्याकरिता मोठ्या शेडची उभारणी करण्यात आली. त्याकरिता नाहरकत प्रमाणपत्रही मिळविण्यात आले; परंतु या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत होती. 

दुर्गंधीमुळे १५ दिवसांपूर्वी गावातील २१ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडली. त्याकरिता गावातच आरोग्य शिबिर घेण्याची वेळ आल होती. त्यामुळे हा कुक्‍कटपालन व्यवसाय बंद करावा, अशी मागणी कंबलपेठा ग्रामस्थांकडून होत होती. 

अधिकाऱ्यांना या विषयावर निवेदनही देण्यात आले. गावकऱ्यांचा पोल्ट्रीला वाढता विरोध पाहता अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी (ता. १२) कंबलपेठा येथे जात परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी गावात प्रवेश करताच त्यांनाही दुर्गंधी असह्य झाली होती. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी पोल्ट्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com