पुणे ः सध्या सर्वत्र ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचे थैमान सुरू असून शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये म्हणून बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मुख्य यार्ड शिरूर येथे भरणारा शेतकरी बाजार (भाजीपाला बाजार) पूर्ववत भरविण्यात येत आहे. मात्र, नागरिक विनाकारण गर्दी करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन बाजार समितीच्या सूचनांचे पालन केले नाही तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ही गर्दी कमी करून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी बाजार समित्या चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सध्या अनेक ग्राहक बाजार समितीत भाजीपाला, फळे घेण्यासाठी खरेदी करत आहे. त्यामुळे ही कमी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने पुढाकार घेत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिल्या आहेत.
सध्या शिरूर बाजार समितीअंतर्गत पिंपळे जगताप आणि तळेगाव ढमढेरे अशा दोन उपबाजार भरविले जातात. तर शिरूर येथील मुख्य बाजारात १५ ते १६ व्यापारी असून येथे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी न करू नये. तरी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वतीने सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे जाहीर आवाहन बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी केले आहे.
व्यापारी, शेतकरी, ग्राहकांनी अशी घ्यावी काळजी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.