रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे मुंगणेकरवाडी परिसरातील दोन बागायतदारांची आंबा कलमे शॉर्टसर्किटमुळे आग लागून खाक झाली. यामध्ये दोन-तीन लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार शनिवारी (ता. 28) दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
या आगीत नाखरे गावातील कृष्ण वसंत महाडीक यांची २२ हापूस कलमे व नारायण बाबू मुंगणेकर यांची पंधरा हापूस कलमे व १५ काजू कलमे जळाली आहेत. बागेच्या जवळून जाणाऱ्या विद्युत कंपनीच्या लाईनमध्ये सकाळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने बागेत शॉर्टसर्किटमुळे गवताला आग लागली. या परिसरातील ग्रामस्थांनी नळपाणी योजना खासगी विहिरी यांच्या पाण्याच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही बागेतील असलेली आग आटोक्यात आली. यात दोन्ही बागायतदारांचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.