यवतमाळ जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेला भीषण आग

जिल्हा बॅंक आग
जिल्हा बॅंक आग

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला गुरुवारी (ता. ९) मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगरशेती विभाग तसेच लेखा व वित्त विभागातील जवळपास ४० संगणक, जुने दस्तऐवज व साहित्य जळून खाक झाले.   शहरातील पाचकंदिल चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुख्य शाखा आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासह संचालकांसाठी प्रतीक्षालय, डाटा सेंटर, वेगवेगळ्या विभागांचा समावेश आहे. बुधवारी (ता. ८) मध्य रात्री दीडच्या सुमारास आग लागली. बँकेच्या चौकीदाराने तत्काळ प्रशासकीय अधिकारी, फायर ब्रिगेड यांना माहिती दिली. काही वेळांतच सर्व यंत्रणा. अग्निशमन दल हजर झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मुख्य शाखेतील शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगर शेती विभाग, लेखा व वित्त विभागातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीत चारही विभागांतील ४० संगणक, लाकडी व लोखंडी कपाट, फर्निचर या साहित्यासोबत दहा वर्षांचे शेती, तसेच बिगर शेती, बँकिंग रेकॉर्ड जळून खाक झाले. दहा वर्षांपासून बँक ‘सीबीएस’ प्रणाली असल्यामुळे कर्जमाफी संदर्भातील सगळा डाटा सुस्थितीत असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी सांगितले.  बँकेची पदभरती ऑनलाइन पद्धतीने असल्याने आगीचा कुठलाच परिणाम प्रक्रियेवर झालेला नसल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे यांनी सांगितले. जिल्ह्यात बँकेच्या ९५ शाखा आहेत. त्यांच्याकडून होणारे पत्रव्यवहार, त्यांच्या मार्फत दहा वर्षांत जो पत्रव्यवहार करण्यात आला, या कागदपत्रांच्या साह्याने जुने रेकॉर्ड पुन्हा गोळा करण्यात येणार आहे. या आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, यांचा पंचनामा सुरू आहे. त्यामुळे नुकसानाची आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.  सहकार खात्याने शासकीय अध्यादेश काढून कुठल्याही सहकारी संस्थेवर केवळ २१ संचालकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात बँकेतील काही संचालक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मागील १२ वर्षांपासून या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक भाजपची सत्ता येताच भाजपच्या ताब्यात गेली. त्यामुळेच नाबार्डकडून मध्यवर्ती बँकेच्या रिक्त १४३ पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. या आगीत बँकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह नोकर भरतीची कागदपत्रे जाळण्यात आली तर नाही ना? अशी चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुनी आहे. बँकेत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता मुख्याधिकारी देशपांडे यांनी वर्तविली आहे. त्याचप्रमाणे दहा वर्षांतील रेकॉर्ड जळून खाक झाले, तरी बँकेत ‘सीबीएस’प्रणालीमुळे हा डाटा रिकव्हर करण्यात येणार असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले. डाटा सेंटर सुरक्षित जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेला आग लागली असली, तरी बँकेचे डाटा सेंटर सुरक्षित आहे. त्यांना कुठलीही हानी झालेली नाही. त्यामुळे खातेदार, शेतकरी यांच्यासह इतर महत्त्वाचे सगळे दस्तऐवज सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com