धुळे : खरीप हंगाम २०२० मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथके नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
खरीप हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये, यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली आहे. या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध करण्यात येणार आहे. या पथकांमध्ये तालुकास्तरावर चार, तर जिल्हास्तरावरील एका पथकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. त्याची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा.
पीक निघेपर्यंत ते सांभाळून ठेवावे. कीटकनाशके, तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. गाडीवरुन खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करू नये. तसेच असे फ्लाय सेलर्स आढळले, तर ०२५६२- २३४५८० या क्रमांकावर संपर्क साधावा. खते खरेदी करताना बिले घ्यावीत. जास्त दराने व झिरो बिल पावतीवर खतांची विक्री होत असेल, तर याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.