सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘सहकार्या’ची गरज

सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘सहकार्या’ची गरज
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘सहकार्या’ची गरज

सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना महापुराने विळखा घातल्याने धान्य, खते, बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यांतील व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५० ते ६० सोसायट्यांचे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सहकारी विविध कार्यकारी सोसायट्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे ७३९ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे आपली सोसायटी कशी आर्थिक भक्कम होईल, यासाठी अनेक सोसायट्यांनी खते, दुकाने, बाजार तसेच सरकारी धान्य विक्री असे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे सोसायट्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. सोसायट्यांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोचली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महापुरामुळे पलूस, वाळवा, मिरज, शिराळा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठी असणाऱ्या गावात पाणी शिरले. २००५ पेक्षा पाणी अधिक येणार नाही, अशी खात्री होती. पण पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत होती. गावेच्या गावे पाण्याखाली गेली. सोसायट्यांमधील खतांची पोती, धान्यांची पोती काढण्यासाठी धडपड सुरू होती. परंतु पाणी गतीने वाढत असल्याने जेमतेम साहित्य बाहेर काढले. पाणी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये घुसले. त्यामुळे सोसायट्यामधील कागदपत्रे, भिजली. त्याचप्रमाणे ज्या सोसायट्यांनी व्यवसाय सुरू केले होते, ते व्यवसाय पाण्यात बुडाले. त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली. अनेक सोसायट्यांनी विमा घेतला आहे. परंतु त्या विम्यातून सोसायटी पुन्हा उभी राहणे अशक्य आहे. त्यामुळे विमा कंपनीने निकष न लावता जे नुकसान झाले आहे, तेवढी भरपाई दिली तरच सोसायटी उभी राहण्यास मदत होईल. ऑडिटची मुदत वाढ हवी सध्या सोसायट्यांचे ऑडिट सुरू आहे. त्यांनतर वार्षिक सभा होते. परंतु पुराचे पाणी सोसायटीमध्ये जाऊन अनेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत. तसेच धान्य दुकान, खत दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोसायटीचे कामकाज पूर्वपदावर येण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे या पूरग्रस्त भागातील सोसायट्यांचे ऑडिटची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी सोसायट्यांने केली आहे.

  • जिल्ह्यातील एकूण सोसायट्या  : ७३९
  • वाळवा, मिरज, पलूस, शिराळा तालुक्यांतील पूरपट्ट्यातील संस्था : १०० ते १२५
  • नुकसान झालेल्या सोसायट्या : ५५ ते ६०
  • ज्या सोसायट्यांचे व्यवसायाचे झालेले नुकसान : १७ ते १८
  •  कार्यालयीन कागदपत्रे व दफ्तर भिजलेल्या सोसायट्या : १० ते १५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com