कोल्हापूर बेहाल; दहा हजार नागरीकांचे स्थलांतर

कोल्हापूर बेहाल; दहा हजार नागरीकांचे स्थलांतर
कोल्हापूर बेहाल; दहा हजार नागरीकांचे स्थलांतर

कोल्हापूर : विविध नद्यांच्या पुरामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरला आहे. सातत्याने पाण्यात वाढ होत असल्याने मंगळवार दुपारपर्यंत दहा हजार हुन अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गतीने पाणी वाढत असल्याने मंगळवार सकाळ पासूनच अनेक गावात जनावरासह संसार सुरक्षित ठेण्यासाठी ग्रामस्थानची धावपळ उडाली. संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता अनेक गावे पूर्ण रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलें आहेत. पिण्यासाठी पाणी नाही,  जाण्यासाठी रस्ते नाहीत आणि वीज सुद्धा नाही अशी कोल्हापुर जिल्ह्याची झाली आहे.

 अतिवृष्टीने कहर केल्यामुळे कोल्हापूर शहर "ब्लॉक" झाले असून कोल्हापूर शहराचा चोहोबाजूंनी संपर्क तुटला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाकडे असलेली यंत्रणाही अपुरी पडत असल्याने शहर आणि जिल्हा प प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न अपुरी ठरत आहेत. सर्वांनी संयम ठेवावा, अपेक्षित सर्व मदत देण्यासाठी प्रशासन  प्रयत्न करत आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 50 गावातील 46 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. धोकादायक परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जेथे शक्य आहे तेथे वीज पुरवठा खंडित करणे सुरू करण्याचे काम सुरू आहे. 

शहरातून बाहेर जाण्यासाठी एकही रस्ता खुला नाही. महामार्ग हा एकमेव असलेला पर्याय सुद्धा मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. दरम्यान मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांचा विसर्ग कायम राहिला. दिवसभर पाऊस व धरणातून जादा पाणी सोडण्यात येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीची लाट पसरली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com