सोलापुर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात

पुर
पुर

सोलापूर : उजनी आणि वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा, नीरा नद्यांची पूरस्थिती कायम असली तरी, शुक्रवारी (ता. ९) पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी करण्यात आल्याने पूरस्थिती असली, तरी ती नियंत्रणात आहे.   शुक्रवारी पुण्याकडून उजनी धरणात येणारा दौंडकडील पाण्याचा विसर्ग ८९ हजार ४५४ क्युसेकपर्यंत होता. पुढे उजनीतून भीमा नदीमध्ये ८० हजार क्‍युसेकपर्यंत विसर्ग होता. तसेच वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग १४ हजार १६१ एवढा कमी करण्यात आला. त्यामुळे भीमा आणि नीरा नदीचा पूरस्थिती काही प्रमाणात कमी झाली आणि नियंत्रणातही राहिली. या पुराचा जिल्ह्यातील १३३ गावांना फटका बसला आहे. तर या गावातील दहा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात दक्षिण सोलापुरातील १५ गावांतील ६४१ हेक्टर, पंढरपूर तालुक्यातील ४४ गावांतील ७२७१ हेक्टर, मंगळवेढा तालुक्यातील १५ गावांतील १७० हेक्टर, मोहोळ तालुक्यातील पाच गावांतील २७५ हेक्टर आणि माळशिरस तालुक्यातील २८ गावांतील १६६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानीमध्ये प्रामुख्याने ऊस, डाळिंब, केळी, कडवळ, मका, तूर, भुईमूग, भाजीपाला आदींचा समावेश आहे. परंतु यापेक्षाही अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com