पुर
पुर

आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळी

नवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान सुरूच आहे. आसाम राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरून लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. आसाममध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला असून, बिहारमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. उत्तर आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस होत असल्याने त्याचा फटका शेती आणि ग्रामीण भागाला बसत आहे. पंजाबमध्ये घग्गर नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत असून, अनेक भागांत नदीचे पाणी शिरले आहे. तसेच पंजाबच्या संग्रुर जिल्ह्यात घग्गर नदीला ५० फुटाचे भगदाड पडल्याने दोन हजार एकरांवरील शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सैन्यदलाचे जवान या भागात बचावकार्य करत आहेत.  आसाममध्ये ३६ मृत्यू आसाम राज्यात ३३ जिल्ह्यांपैकी तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. पुरामुळे राज्यातील ५४ लाख लोकांचे जनजीवन प्रभावित झाले असून त्यांना स्थलांतर करावे लागले आहे. राज्यात पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३६ वर पोचली आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून ५३ लाख ५२ हजार १०७ लोकांना आत्तापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आसाम आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. बिहारमध्ये सर्वाधिक जीवितहानी  बिहारमध्ये नेपाळच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये पूर आल्याने आत्तापर्यंत ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सितामऱ्ही जिल्ह्यात सर्वाधिक १८ मृत्यू झाले असून मधुबनी १४, अरारिया १२, शोहार ९, दरभंगा ९, पुरनिया ७, किशनगंज ४, सुपौल ३ आणि पूर्व चंपारणमध्ये २ मृत्यू झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com