सोलापुरातील पूर काहीसा ओसरला

सोलापुरातील पूर काहिसा ओसरला
सोलापुरातील पूर काहिसा ओसरला

सोलापूर : उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा, नीरा नदीची पूरस्थिती शनिवारी (ता. १०) काहीशी ओसरली. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. 

उजनी धरणात दौंडकडील पाण्याचा विसर्ग शनिवारी ४४ हजार ४६२ क्युसेकपर्यंत होता. पुढे उजनीतून भीमा नदीमध्ये ८० हजार क्‍युसेकपर्यंत विसर्ग कायम होता. दौंडकडील विसर्ग कमी झाला आहे. तसेच वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला विसर्गही १४ हजार १६१ एवढा कायम होता. परंतु पूरस्थिती नियंत्रणात आहे.

पुराच्या पाण्यामुळे पंढरपूर शहरातील विविध भागांत पाणी शिरले होते. शनिवारी हा सर्व भाग पालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ करण्यात येत होता. 

नदीकाठच्या भागातील घरे आणि दुकाने स्वच्छ केली जात होती. पुरानंतर साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून साथरोग प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या दोन्ही मोठ्या पुलावरची वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे शहरात सोलापूर, बार्शी या भागातून येणारी वाहतूक सुरू झाली. परंतु पंढरपूर- मंगळवेढा मार्ग बंदच होता. 

ओझरे बंधारा वाहून गेला माळशिरस तालुक्यातील ओझरे (तांबवे) येथील बंधारा वाहून गेला आहे. तिरवंडी बंधाऱ्यांचा पोहोच रस्ता, तर माळीनगर (लुमेवाडी) व गणेशगाव बंधाऱ्यांचा भराव खचल्याने वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना आता बंधाऱ्यात पाणी साठण्याची चिंता लागली आहे. माळीनगर (लुमेवाडी) येथील बंधाऱ्यांचा भराव, संरक्षक भिंत, पिचिंग वाहून गेली आहे. गणेशगाव येथील बंधाऱ्याच्या दोन्ही टोकांकडचा भराव मोठ्या प्रमाणावर खचून वाहून गेला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com