सांगलीत पूरस्थिती गंभीर

पूरस्थितीमुळे ग्रामस्थांचे स्थलांतर
पूरस्थितीमुळे ग्रामस्थांचे स्थलांतर

सांगली : जिल्ह्यात पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे. वारणा आणि कृष्णा नदीने रुद्रावतार धारण केला आहे. वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथील आयर्विन पुलाजवळची पातळी दुपारी दोन वाजता ५१ फूट इतकी झाली आहे. २००५ मधील महापुराचा विक्रम या वर्षी मोडण्याची शक्यता आहे.

कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील मारुती चौक, टिळक रोड, कोल्हापूर शिवाजी मंडई, आमराई चौक, गावभाग, तसेच मल्टिप्लेक्स परिसरात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील ३१ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे. सोमवारी (ता. ५) सकाळी आयर्विन पुलाजवळ ४६ फूट इतकी पाण्याची पातळी होती. गेल्या चौवीस तासांत ५ फुटाने पाणी पातळी वाढली. कोयना धरणातून १ लाख ९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

एनडीआरएफचे पथक सांगलीत दाखल झाले असून सकाळपासून बचाव कार्य सुरू केले आहे. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे पथकाने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

पुराच्या धास्तीने बाधित गावांनी रात्र जागून काढली आहे. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे मोबाईल चार्जिंग नसल्याने नातेवाइकांशी संपर्क करता आला नाही. तसचे बचाव पथकालाही संपर्क झाला नाही. त्यामुळे धास्ती वाढली आहे. शिराळा तालुक्यातील सोनवडे, आरळा, काळुंद्रे, चरण, मोहरे, पुनवत, सागाव, मांगले, देववाडी, कोकरूड या दहा गावांत पुराचे पाणी शिरले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com