केदारखेडा, जि. जालना : बाणेगाव येथील धरणात साठ ते सत्तर टक्के पाणीसाठा आहे. परंतु प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
बाणेगाव येथील लघुप्रकल्पाचे काम नोव्हेबर २००३ ला सुरू होऊन २००५ मध्ये पूर्ण झाले. तरी संपादित जमिनीचा शासनाकडून मावेजा मिळाला नव्हता. तरीही त्या शेतकऱ्यांनी शासनाला धार दाबण्यासाठी सहकार्य केले. त्या शेतकऱ्यांचा मावेजा धरणाची धार दाबल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर मिळाला. या मुळे संबंधित खात्याच्या त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले होते.
धरणात पाणी असूनही त्याचा शेतकऱ्यांना लाभच नाही. या कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडले असते, तर शासनाची पाणी पट्टी वसुली झाली असती. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतून पाट गेले. त्यातील काही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला. परंतु, यात डाव्या कालव्याकडील बामखेडा येथील शेतकऱ्यांची मावेजा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
धरणाच्या उजव्या कालव्याची जमीन शेतकरी संपादित करू देत नसल्याने तो कालवा बंद आहे. डावा कालवा काही ठिकाणी अपूर्ण आहे. तो पूर्ण करूनच पाणी सोडले जाईल. डाव्या कालव्यासाठी पाणी सोडण्याला अडचण आली नाही, तर पाणी सोडू. - एस. डी. चौधरी, उपअभियंता, जलसंपदा, भोकरदन.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.