गिरणा धरणाच्या आवर्तनातून खरिपाची तहान भागणार

गिरणा धरणाच्या आवर्तनातून खरिपाची तहान भागणार
गिरणा धरणाच्या आवर्तनातून खरिपाची तहान भागणार

जळगाव : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. खरिपातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून, त्यासाठी गिरणा धरणातून खरिपासाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. या संदर्भात अर्जांची प्रक्रिया व पीकस्थिती याबाबत जिल्हा प्रशासनाने नुकतीच चर्चा केली.

या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर व इतर अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या जामदा उजवा कालवा, पांझण डावा कालवा व निम्मगिरणा कालव्यावरून पाणी सोडले जाईल. ३१ ऑगस्टपर्यंत पाण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतील. सुमारे २१ हजार हेक्‍टरला गिरणा धरणाच्या पाण्याचा लाभ होत असून येत्या १४ ऑक्‍टोबरपर्यंत सिंचन केले जाईल, असे गृहीत धरून नियोजन केले आहे.

ज्वारी, कापूस, कडधान्ये, गळीतधान्ये, भाजीपाला व चारापिके यांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. त्यानुसार अटी लक्षात घेऊन नमुना क्रमांक सात आणि पाणी अर्ज नमुना सात अ, सात ब सादर करून संबंधित शेतकरी पाण्याची मागणी करू शकतील. पाटशाखेच्या कार्यालयात निर्देशित कार्यालयीन वेळेत हे अर्ज सादर करायचे आहेत. ज्यांनी २०१७-१८ या दरम्यानची पाणीवापरासंबंधी पाणीपट्टी भरली आहे, त्यांचे अर्ज स्वीकारले जातील. प्रत्येक चारीच्या मुख्यानजीकच्या क्षेत्रासाठीच पाण्याची मंजुरी दिली जाईल. चारी स्वच्छ, गवत काढलेली असावी. ज्या पिकांसाठी पाणी वितरण मंजूर आहे, त्यांची नोंद आवश्‍यक आहे. इतर पिकांना पाणी दिले जाणार नाही.

काही अपरिहार्य कारणामुळे पाणीपुरवठा झाला नाही. पाण्याअभावी पिकाचे नुकसान झाले तर त्याला जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com