छावण्या झाल्या बंद, मात्र शेतकऱ्यांचा चिंता कायम

छावण्या झाल्या बंद, मात्र शेतकऱ्यांचा चिंता कायम
छावण्या झाल्या बंद, मात्र शेतकऱ्यांचा चिंता कायम

नगर ः दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शासनाने छावण्या सुरू केल्या. मध्यंतरी झालेल्या अल्प पावसानंतर जिल्हाभरात तब्बल ३४३ जनावरांच्या छावण्या बंद झाल्या, पण आता पावसाने ओढ दिली, चाराही उपलब्ध नाही. त्यामुळे चारा नसल्याने जनावरे जगविण्याची चिंता कायम आहे. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भर पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि अनेक भागांत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या फक्त १६३ छावण्या सुरू आहेत.   नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाच्या गंभीर झळा सोसाव्या लागल्या. सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. गतवर्षीच्या परिस्थितीचा विचार करता बहुतांश शेतकऱ्यांना जनावरे जगवणे अवघड झाले होते. त्यामुळे ग्रामीण, दुष्काळी भागातील जनावरे जगविण्यासाठी शासनाने जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. यंदा जुन अखेरपर्यंत छावण्याचा आकडा ५०४ पर्यंत गेला होता. छावण्यात तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक जनावरे होती. छावण्यामुळे चारा आणि पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला होता.  यंदा पाऊस साधारण पंधरा दिवस उशिराने आला. मात्र मागील आठवड्यात काही भागांत पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेली. त्यामुळे प्रशासनाने जनावरांच्या छावण्या बंद केल्या. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पावसाने दडी मारली आहे. मुळात पाऊस सुरू झाल्यानंतर महिना ते दीड महिन्यानंतर चारा उपलब्ध होत असतो. आता जनावरांच्या छावण्या बंद झाल्या. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ३४३ छावण्या बंद झाल्या असून, सध्या केवळ १६३ छावण्या सुरू असून त्यात ९३ हजार जनावरे आहेत. मात्र ज्यांनी जनावरे घरी नेली, त्यांना आता चारा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने जनावरे जगविण्याची चिंता निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भर पावसाळ्यात जनावरांच्या चऱ्याचा आणि अनेक भागांत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बंद झालेल्या छावण्या आता पुन्हा विनाअट सुरू कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह लोक करू लागले असून पालकमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वीच संपला चारा  नगर जिल्ह्यामध्ये खरीप, रब्बीतील पिके, चारा लागवड, गवत आणि डोंगरातून चारा उपलब्ध होतो. गेल्यावर्षी खरिपाची पिके हाती आली नाही. रब्बीत पेरणीच झाली नाही. शिवाय पाऊस नसल्याने डोंगरातूनही पुरेसा चारा मिळाला नाही. चारा लागवड मर्यादित होती. या सर्व बाबींचा चारा उपलब्धतेवर परिणाम झाला. त्यामुळे जुन, जुलैपर्यंत पुरेसा असलेला चारा यंदा फेब्रुवारीमध्ये म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच संपल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. जनावरांच्या छावण्या सुरू केल्यानंतर तेथे वाळलेला चारा, कडवळ मका उपलब्ध होत नसल्याने बहुतांश जनावरांची भूक केवळ उसाच्या चाऱ्यावरच भागवावी लागली आहे. सध्या कोणत्याही तालुक्यात चारा उपलब्ध नाही. सध्या सुरू असलेल्या छावण्या (कंसात जनावरे)

नगर   १९ (१२,६९९) 
जामखेड   ११ (६८५९)
पारनेर १५ (१५९५१)
कर्जत   ५२ (२४२८८)
पाथर्डी   २८ (१३५५९)
श्रीगोंदा   २२ (११६११)
शेवगाव १० (५६२३)
संगमनेर  ४ (३१३७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com