नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर जिल्ह्यांतून चारा

नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर जिल्ह्यांतून चारा
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर जिल्ह्यांतून चारा

नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत. सध्या जिल्ह्यातील चारा संपल्याने दावणी आणि छावणीतील जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न आहे. उजनी, मुळा, भंडारदरा आदी धरणांच्या लाभक्षेत्रातील आडसाली ऊस तीन महिने पुरेल, असे प्रशासन सांगते. दुसरीकडे छावण्यांबाबत शासनाने कडक नियमावली राबविल्याने कटकट नको, म्हणून अनेक छावणीचालकांनी बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणण्यास सुरवात केली आहे. सध्या पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद या शेजारच्या जिल्ह्यांतून चाऱ्याची वाहतूक सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे नागरिक, शेतकरी त्रस्त आहेत. चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे. त्यामुळे पशुधन जगवणे एवढेच काम सध्या लोकांना आहे. जनावरे जगविण्यासाठी शासनाने छावण्या सुरू केल्या. पण, छावणी चालकांनाही चाऱ्याची चिंता आहेच. 

जिल्ह्यात १६ लाख ४१ हजार मोठी व ११ लाख ५० हजार लहान जनावरे आहेत. त्यांना दरमहा दोन लाख ३५ हजार मेट्रिक टन चारा लागतो. 

पशुधन वाचविण्यासाठी शासनाने दुष्काळात चारा छावण्या सुरू केल्या. सध्या ४०० छावण्यांमध्ये लहान-मोठी पावणेदोन लाख जनावरे आहेत. संबंधित चालकांकडून सरकारने ४० प्रकारच्या अटी व शर्ती घालून दिल्या. त्यात मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ व लहान जनावरांना प्रतिदिन ७.५ किलो हिरवा चारा आणि आठवड्यातून तीन दिवस एक व अर्धा किलोप्रमाणे पशुखाद्य देण्याची प्रमुख अट ठेवण्यात आली. शिवाय मोठ्या जनावरांना सहा किलो व लहान जनावरांना तीन किलो वाळलेला, प्रक्रिया केलेला चारा देण्याचेही सांगण्यात आले.

मार्चअखेर जिल्ह्यातील चारा वापरण्यात आला. मात्र, ३० जूनपर्यंत छावण्या सुरू ठेवण्यात येणार असल्याने पुढचे तीन महिने कसे काढायचे, हा महत्त्वाचा प्रश्‍न होता. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छावणी बंद केल्यास मागील १५ दिवसांचे अनुदान दंड म्हणून वसूल करण्याच्या नियमामुळे, छावण्या सुरू ठेवण्यासाठी चालकांना आता कसरत करावी लागत आहे. सध्या शेजारच्या जिल्ह्यातून ऊस व उपलब्ध असेल. त्या हिरव्या चाऱ्याची वाहतूक सुरू झाली आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व वाहतूक या खर्चाचा ताळमेळ चालकांना बसविता येणार का, हा प्रश्‍न आहे.

गाळपेराची मका उपयोगी जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात गाळपेर क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हेक्‍टरपर्यंतचे बियाणे वाटले होते. त्यातून अंदाजे एक लाख ३५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील आडसाली उसाचाही चारा म्हणून उपयोग करणे सुरू आहे. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत पाच हजार ८१७ हेक्‍टर व गाळपेर क्षेत्रावर ४५१ हेक्‍टर मका घेण्यात आली. तीही चारा म्हणून दिली जाऊ शकते. आडसाली ऊस सध्या चार ते आठ महिन्यांचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com