फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र

फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र

फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. चार हजार आठशे ते साडेपाच हजार रुपये टनाने शेतकऱ्यांना जनावरांसाठी उसाची खरेदी करावी लागत आहे.

सतत दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई, पशुखाद्य, चाऱ्याचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोचणे आदी कारणांमुळे फुलंब्री तालुक्‍यात गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू केला. मात्र सततची दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध वसायावर झाला आहे. दुग्धव्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो; परंतु आता हा व्यवसायही धोक्‍यात आला आहे. 

पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले. तरीही अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. यंदा चांगला पाऊस झाला, तर किमान पुढच्या काळात चाराटंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. चारा आणि इतर वस्तूंच्या दरांत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला उसाचा चारा परवडत नाही. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहेत. पाण्याअभावी जनावरांची निगा कशी राखायची, हा प्रश्‍न आहे. 

बियाणे खरेदी करायचे की चारा...

मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमालीचे घटले. शेतकऱ्यांना चारा व पाणी प्रश्न भेडसावत आहे. एकीकडे चार हजार आठशे ते साडेपाच हजार रुपये टनाने उसाचा चारा घ्यावा लागत आहे. दुसरीकडे दुधाला कवडीमोल भाव आहे. जनावरांचे खाद्य व चाऱ्याच्या भावाची तुलना केल्यास शेतकऱ्याच्या पदरात कवडीही पडत नाही. सध्या खरीप पीक लागवडीची लगबग आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करायचे की जनावरांसाठी चारा, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com