बोंड अळीमुळे पूर्वहंगामी कापसाचे ४० हजार हेक्‍टर क्षेत्र खानदेशात रिकामे

बोंड अळीमुळे पूर्वहंगामी कापसाचे ४० हजार हेक्‍टर क्षेत्र खानदेशात रिकामे
बोंड अळीमुळे पूर्वहंगामी कापसाचे ४० हजार हेक्‍टर क्षेत्र खानदेशात रिकामे

जळगाव ः खानदेश आणि लगतच्या भागात पूर्वहंगामी कापसाखालील सुमारे ३० ते ४० हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने हे क्षेत्र रिकामे केले. त्यात ज्वारी, बाजरी, गहू, कांदा व इतर कमी कालावधीच्या पिकांची पेरणी, लागवड शेतकऱ्यांनी केली.  बाजरीची पेरणी खानदेशात अजूनही सुरू आहे. काही शेतकरी संकरित ज्वारीदेखील पेरत आहेत. कारण, पूर्वहंगामी कापूस पिकात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान येईल, वेचणीलाही कापूस पीक परवडणार नाही. यामुळे हे क्षेत्र रिकामे करून अन्य पिके पेरत आहेत. मका लागवड कमी आहे. परंतु बाजरी, गहू व ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. खानदेशात यंदा २५ मे नंतर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली. ती जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव भागात अधिक आहे. गिरणा व तापी नदी काठी अधिकची लागवड झाली होती. धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे भागांत आणि नंदुरबारात शहादा, तळोदा व नंदुरबारात अधिक लागवड झाली. खानदेशात सुमारे एक ते दीड लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली होती. पहिल्या चार पाच वेचण्या किडी व गुलाबी बोंड अळीरहित आल्या.  सध्या पिकांत हा प्रादुर्भाव ६० ते ६५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी पाहणी करून गुलाबी बोंड अळीसंबंधी पुष्टी दिली. पिकाचे नुकसान निश्‍चित आहे. पाणी व वेळ वाया घालविण्याऐवजी शेतकरी पीक काढून ते जाळत आहेत. खानदेशात रब्बी हंगामातील पेरणी तापी, गिरणा, सुसरी, पांझरा, गोमाई व इतर नद्यांच्या काठावर ही पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com