बेचाळीस वर्षांच्या लढ्याला यश

येवला, जि. नाशिक : डोंगरगाव येथील साठवण तलाव कधी पूर्ण भरलाच नाही आणि जेव्हा भरला तेव्हा त्यावरील वितरिकेला कधी पाणी मिळालेच नाही. मात्र पिंपळखुटे बुद्रुक व परिसरातील शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे अखेर ४० वर्षांनंतर या वितरिकेला पाणी सुटले आहे. यामुळे सुमारे शंभर एकरांच्या आसपास पिकांना याचा फायदा होत आहे.
Forty-two years of fighting success
Forty-two years of fighting success

येवला, जि. नाशिक : डोंगरगाव येथील साठवण तलाव कधी पूर्ण भरलाच नाही आणि जेव्हा भरला तेव्हा त्यावरील वितरिकेला कधी पाणी मिळालेच नाही. मात्र पिंपळखुटे बुद्रुक व परिसरातील शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे अखेर ४० वर्षांनंतर या वितरिकेला पाणी सुटले आहे. यामुळे सुमारे शंभर एकरांच्या आसपास पिकांना याचा फायदा होत आहे. 

१९७० च्या सुमारास डोंगरगाव परिसरातील गावाचा शेती सिंचनाचा, जनावरांचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी हा लघुतलाव मंजूर करून रोहयोअंतर्गत १९७२ पर्यंत या लघू तलावाचे काम पूर्ण केले होते. पुढे त्याला वितरिकाही करण्यात आली. या वितरिकेला १९७६, ८० व ८३ च्या दरम्यान पाणी सोडल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर अद्यापही पाणी सोडले जात नव्हते. दहा वर्षांपासून डोंगरगावचा तलाव भरला जातो, पण डोंगरगाव तलावातून पिंपळखुंटे बुद्रुक व तळवाडे परिसरासाठी पाणी जाणारी वितरिका बुजली होती. या संदर्भात पिंपळकुटे येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी उपोषण केल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागातर्फे सुमारे पाच किलोमीटरची ही वितरिका खोदून काढण्यात आली. त्यामुळे या वर्षी धरण पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते.

डोंगरगाव धरणातून पाणी सोडू नये, पिण्यासाठी पाणी ठेवावे ही मागणी करत काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र पिंपळखुटे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत या तलावात पाणी योजना नसल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर न्यायालयाने पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता.१२) पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याने कालव्याला पाणी सोडले. पाण्यासाठी ४२ वर्षे प्रतीक्षा परिसरातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. लाभक्षेत्रातील पिंपळखुटे, भुलेगाव, देवठाण, तळवाडे, डोंगरगाव या गावातील शेतकऱ्यांना सुमारे बेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाण्याचा लाभ मिळाल्याने या गावातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.  सात ते सात दिवस हे पाणी सुरू राहणार असून ८० ते १०० एकरांपर्यंत याचा फायदा होऊ शकेल अशी माहिती डॉ. सतीश कुऱ्हे यांनी दिली.

डॉ. कुऱ्हे, साहेबराव उंडे, अनिल उंडे, चंद्रकांत आढाव, अण्णा कुर्हे, रखमा पवार, अण्णा पवार, जगन पवार, गोरख अरखडे, संदीप उंडे, हरिभाऊ उंडे, कचरू डुंबरे, बाळू रोठे, दीपक उंडे यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com