आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टी

बॅंका, विकास सेवा सोसायट्या आणि वेळप्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढोबळी मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने सारं होत्याचं नव्हतं झालं.
Four times heavy rain in Atpadi taluka
Four times heavy rain in Atpadi taluka

आटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या आणि वेळप्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढोबळी मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने सारं होत्याचं नव्हतं झालं. तालुक्‍यात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेती, शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.

दुष्काळी म्हणून आटपाडीची ओळख आहे. कमी पाऊस नेहमीचाच. शेतकरी कमी पाण्यात येणारी पिके घेतात. डाळिंब हुकमी पीक. अलीकडे टेंभूचे पाणी आल्याने द्राक्ष, ढोबळी मिरची, शेवगा, मका, झेंडू आणि इतर भाजीपाल्याचे क्षेत्र चांगलेच वाढले.मृगात जून, जुलैमध्ये बहुतांश डाळिंबाच्या भागाचा हंगाम धरला. सर्व प्रकारच्या भाजीपाला, झेंडूची लागवडही केली होती. कमी पाण्यात येणारी पिके असताना जून पासून पावसाची संततधार आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली. तीन वेळात १०० मिलिमीटर वर एकाच वेळी पाऊस कोसळला. साऱ्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले. पिके पाण्याखाली गेली.

डाळिंब बागांत गुडघाभर पाणी साचून राहिले. मोठ्या प्रमाणात फळकुजवा, फळगळ सुरू झाली. बघता बघता झड रिकामी झाली. उशिराने झालेल्या बागांची फूलगळ झाली. डाळिंबासह सर्व शेतांत पाझर लागलेत. डाळिंबात मर रोग वाढला आहे. द्राक्षाची ५०० हेक्‍टरवर क्षेत्र आहे. हंगाम धरण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीत सारे काही वाहून गेले. द्राक्ष, डाळिंब बागांना घातलेली खते वाहून गेली. ढोबळी मिरची, शेवगा, भुईमूग, बाजरी, झेंडू हिप क्रिकेटर रानात सोडून आणि कुजत चाललीय. शेतकऱ्यांनी केलेला लाखोंचा खर्च वाया गेला.

अनेक ठिकाणी ओढा पात्राचे पाणी शेतातून गेले आहे. अडीचशे हेक्‍टर क्षेत्र पाण्याने वाहून गेलेय. ओढ्यात असलेल्या पाईप, मोटारी, वायर आणि आणि कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. सागर तलाव, साठवण तलाव, नालाबांध, बंधारे, शेकडो विहिरी गाळाने बुजल्या आहेत.

रब्बी हंगामातील पेरण्या धोक्‍यात सततच्या पावसामुळे शेतात आणि पाणी साचला आहे. अनेक शेतांना पाझर लागले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या धोक्‍यात आले आहेत. पाणी आटून आणि पाझर थांबून तनक केव्हा काढायची आणि पेरण्या कधी होणार?, सारे अंधारात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com