पाच हजार शेतकऱ्यांना मोफत कांदा बियाण्यांचे वितरण 

राज्यात यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पाच हजार सभासदांना मोफत बियाण्यांचे वितरण करण्यात आले. ‘महाएफपीसी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट मिळाली आहे.
पाच हजार शेतकऱ्यांना मोफत कांदा बियाण्यांचे वितरण 
पाच हजार शेतकऱ्यांना मोफत कांदा बियाण्यांचे वितरण 

पुणे : राज्यात यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पाच हजार सभासदांना मोफत बियाण्यांचे वितरण करण्यात आले. ‘महाएफपीसी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट मिळाली आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा कांदा रोपवाटिका व बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कांदा लागवडीवर मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर मधल्या काळात वाढल्यानंतर शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल देखील वाढला. मात्र, त्यातून कांदा बियाण्यांचा तुटवडा तयार झाला आहे असून शेतकरी हैराण झाला आहे. 

“महाएफपीसीने या स्थितीचा अभ्यास करीत कांदा बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या प्रयत्नांना यश मिळाले असून पहिल्या टप्यात पाच टन कांदा बियाणे उपलब्ध झाले आहे. मात्र बियाण्याची उशिरा होणारी उपलब्धता आणि राज्यातील थंडीचे वाढते प्रमाण यामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळेच बाजारभावानुसार अडीच कोटी रुपयांचे कांदा बियाणे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला,”अशी माहिती योगेश थोरात यांनी दिली. 

किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांद्याची शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी झाली होती. कांदा बियाणे देखील याच पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांना वाटण्यात आले आहे. मात्र, शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून बियाण्याची मागणी अजूनही कायम आहे. परंतु, रोपवाटिका तयार करण्यात उशीर होत आहे. “शास्त्रीय बाबी तपासून दिवाळीनंतर शेतकऱ्यांना स्वस्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न महाएफपीसीचा सुरू आहे,”असे श्री.थोरात यांनी स्पष्ट केले. 

केंद्राला स्थिती सांगितल्याचा फायदा  राज्यातील कांदा बियाण्यांच्या टंचाईबाबत कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाला काही दिवसांपूर्वीच सविस्तर माहिती दिली होती. त्याची गंभीर दखल केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी घेत महाराष्ट्राला ताबडतोब कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले. “राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाने केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित असलेले विभाग, नाफेड तसेच इतर यंत्रणांशी समन्वय साधला. बियाणे उपलब्ध होण्यासाठी परवाना प्रक्रिया देखील युद्धपातळीवर पूर्ण करून ऑनलाइन परवाने वाटले गेले,” अशी माहिती राज्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com