सांगलीतील अकरा कारखान्यांकडे २६५ कोटींची एफआरपी थकली 

सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असला तरी, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे एफआरपीचे २६५ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या रकमेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सांगलीतील अकरा कारखान्यांकडे २६५ कोटींची एफआरपी थकली 
सांगलीतील अकरा कारखान्यांकडे २६५ कोटींची एफआरपी थकली 

सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असला तरी, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे एफआरपीचे २६५ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या रकमेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

जिल्ह्यात यंदा १२ साखर कारखान्यांनी साडेतीन ते चार महिन्यांचा गळीत हंगामात ६६ लाख ७९ हजार ३८५ टन उसाचे गाळप करून ८२ लाख ४६ हजार ८४९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर चार कारखाने यंदा सुरू होऊ शकले नाहीत. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) मधील तरतुदीनुसार हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलाची रक्कम १४ दिवसांत शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यास कलम ३ (३ ए) नुसार विलंब कालावधीसाठी १५ टक्‍के व्याज आकारण्याची तरतूद आहे. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली नाही, त्यांनी तत्काळ द्यावी, असे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना यापूर्वीच दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे. 

संपलेल्या हंगामात उसाचे उत्पादन घटल्याचे चित्र दिसून आले. महापूर आणि अवकाळी पावसामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कारखान्यांचा हंगामही महिनाभर उशिराने सुरू झाला. शेतकरी संघटनांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली. परंतु जिल्ह्यात त्यावर तोडगा निघाला नाही. हंगाम सुरू झाल्यानंतर दत्त इंडिया व निनाईदेवी- दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली. इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले. दोन किंवा तीन टप्प्यात एफआरपी देण्याचे ठरले. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून तसे लेखी लिहून घेतले. 

सद्य:स्थितीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रक्कम २६५ कोटी रुपये इतकी आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्यांना तत्काळ रक्कम देण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन केले नसल्याचे दिसून येते. सध्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी तसेच खरीप हंगामातील पिकाच्या बियाणांसाठी पैशाची मोठी गरज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com